हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हा मधील विक्रमगड तालुका येथे वसलेले एक आदिवासी बहुल गाव आहे. टेटवली गाव परिसरात नैसर्गिक सौंदर्य, डोंगराळ भाग आणि घनदाट जंगल आढळते. गावात पारंपरिक आदिवासी संस्कृती व जीवनशैली आजही जपली गेली आहे.
सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार टेटवली गावात सुमारे ५०० ते ६०० कुटुंबे राहतात. एकूण लोकसंख्या अंदाजे २५०० ते ३००० दरम्यान असून त्यामध्ये पुरुष व महिला संख्या जवळपास समान आहे. येथे प्रामुख्याने वारली (आदिवासी) व कुणबी समाजातील लोक वास्तव्य करतात.
कुणबी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून ते भात शेती, भाजीपाला उत्पादन यामध्ये कार्यरत आहेत. आदिवासी समाजातील लोक शेतमजुरी, वीटभट्टी कामगार, बांधकाम कामगार म्हणून काम करतात. तसेच काही कुटुंबे कुक्कुटपालन, बकरीपालन व लघुउद्योग करून आपला उदरनिर्वाह करतात.
श्रावण महिन्यात, विशेषतः पावसाळ्यात, टेटवली परिसरात नैसर्गिकरित्या उगवणारी एक खास भाजी म्हणजे अळंबी (मशरूम) होय. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सतत कोसळणाऱ्या पावसाच्या वातावरणात ही भाजी रानात उगवते. अळंबी अत्यंत चविष्ट व पौष्टिक असल्याने स्थानिक लोकांमध्ये तिची मोठी मागणी असते.

मा. मुख्यमंत्री

मा. उपमुख्यमंत्री

मा. उपमुख्यमंत्री

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

गट विकास अधिकारी
पंचायत समिती विक्रमगड

सरपंच
ग्रामपंचायत टेटवली

उपसरपंच
ग्रामपंचायत टेटवली

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत टेटवली